शब्द,
भाषा आणि विचार प्रवाह
ज्ञान-विज्ञान हा आपला आरसा आहे; त्यामध्ये
आपल्या चेहऱ्याचे सौन्दर्य तर पहायचे आहेच;
पण त्यापलीकडे आपल्या मनाचे आणि
बुद्धीचे सौन्दर्य, विकसनशीलता आणि वैभव….. नुसते पहायचे नसून वारंवार तपासून घ्यायचे
असते आणि घ्यायचे आहे....हे प्रत्येक वर्तमानाचे आपल्याला आवाहन आणि आव्हान आहे.
शब्द आणि भाषा ह्यांच्या प्रेमातून विचारांचा अविष्कार होतो. म्हणून
असं म्हणतात की विचारांची सुसूत्र मांडणी म्हणजे शब्द आणि भाषा ह्यांच्या प्रेमाचे
सृजनात्मक अपत्य आहे. काळाच्या संदर्भात आपण जेव्हा संस्कृतीचा विचार करतो, तेव्हा
आपण काळाच्या प्रवाहात विचारप्रवाहाचा अभ्यास करीत असतो. अशा प्रकारे, शब्द, भाषा, संस्कृती
आणि विचार ह्यांचे अन्याय नाते आहे.
साहित्य हे सांस्कृतिक मूल्य आहे. ह्याचा अर्थ "तिळगुळ घ्या, गोड
बोला" ह्या आपल्या संस्कृतीचे मूल्य आहे....संक्रांत ह्या सणाचे मूल्य ही
आपली संस्कृती ह्या अर्थाने आहे की " सत्यम ब्रूयात" हे आहेच; शिवाय
" प्रियं ब्रूयात " हे आहे...गोड बोला, पण सत्य बोला....
आपण साहित्यातून हाच विचार मांडतो की
गोड बोलताना..... हे गोड बोलणे, खरे आणि मनापासून असले पाहिजे; तरच
ते संस्कृती मूल्य आहे...
साहित्य हे आपल्या हिंदू तत्वज्ञानच्या मुशीतून घडलेले आहे; त्यामध्ये
विशाल विचार आहे...संकुचित विचार हा नाही की मी धार्मिक आहे; कारण आपली
संस्कृती धर्म प्रधान नाही; म्हणूनच इतर कोणत्याही धर्मातील चांगली मूल्ये आपली
संस्कृती अंगीकृत करत आलेली आहे आणि म्हणूनच 450 वर्षे इंग्रज-मुसलमान राजवटींच्या जुलमी
सत्तेत असूनही ती आज पर्यन्त नुसती टिकून नाहीयेय, तर धर्म निरपेक्षितात ह्या संवैधानिक तत्त्वचिंतकाची
बैठक झाली आहे. संवैधानिक तत्व आणि मराठी
साहित्य हे कधीच एकमेकांच्या विरोधात उभे नव्हते. ब्रिटिश आणि मुसलमान राजवटीतही
तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर इ संत झाले आणि सांस्कृतिक मूल्य धारक
साहित्य निर्माण करू शकले.
राजकारण आणि साहित्य ह्यांचे एकत्रीकरण होऊ नये, हा
आग्रह असण्याचे कारण मराठी किंवा कोणत्याही साहित्याला अभिजात दर्जा हवा असेल, तर
काही पथ्ये निश्चितपणे अंगिकारली पाहिजेत.
त्यातील मुख्य तत्व साहित्य बाह्य मूल्यांचा, कला बाह्य मूल्यांचा त्याग हे एक आणि
दुसरे मूल्य म्हणजे समीक्षा शास्त्राकडे पाहण्याची निर्मळ दृष्टी हवी. समीक्षक आणि
समीक्षा ह्यांची टिंगलटवाळी करून आपली दृष्टी निर्मळ होऊ शकणार नाही, हे
दुसरे महत्वाचे तत्व आहे.
दुर्दैवाने मराठीत समीक्षा दुर्लक्षित आहे, हे मर्ढेकरांपासून ते विंदा, पाडगावकर
आणि वा ल कुलकर्णी आदींनी मान्य केलेले मत आहे. मराठीत जेव्हढया मोठया प्रमाणात
साहित्य किंवा साहित्याच्या नावाखाली छपाई आणि प्रसिद्धी (!) होत आहे, त्यांच्या
अगदी अल्प प्रमाणात समीक्षक आहेत आणि समीक्षा उपलब्ध आहे, हे
सत्य स्वीकारले पाहिजे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा देताना अनेक कारणे विचारात घेणे आवश्यक आहेत; त्यातील
एक महत्वाचे कारण आहे. चिकित्सा आणि समीक्षेचा अभाव आहे, असे
म्हणण्याचे धाडस मी करणार नाही, पण दुर्लक्ष नक्कीच आहे.
दुर्दैवाची, अशी गोष्ट आहे की मराठी साहित्यिकच नाही, तर
मराठी माणसाला सुद्धा टीका हा प्रकार नुसता आवडतच नाही, तर
दु:स्वास करण्याचा, द्वेष-विद्वेष पसरविण्याचा विषय आहे...हे कटू, पण
सत्य आहे; असे मला वाटते.
*************