Sunday, 23 August 2020

हे प्रीय - एक कविता

 छांद्योग्य उपनिषदात एक गोड गोष्ट आहे.  उद्दालक आपला पुत्र, श्वेतकेतुला पिंपळाच्या झाडाची फळे काढून आणायला सांगतो. मग ती फळे कापून बिया काढायला सांगतो. शेवटी बिया फोडून आत काय आहे, हे विचारतो. श्वेतकेतू म्हणतो, " बियांच्या आत बियांचेच बीजमय पदार्थ कण दिसत आहेत. " तेव्हा उद्दालक म्हणतो, " बियांचे आत बीजकण म्हणजेच बियाच दिसतात ना ! पण त्यांच्यात असलेली प्रचंड शक्ती दिसत नाहीयेय. ही शक्तीच महान, प्रचंड वृक्ष निर्माण करते." 

                        हे प्रीय ह्या हिंदी कवितेत नेहा भांडारकर म्हणतात, " बीज में ताकद है वृक्ष बोनेकी " मानवी जीवन असेच महान आहे. हे प्रीय.....ये मानवा, माझ्या प्रीय बांधवांनो, तुमच्यामध्ये असेच बीज आहे..... ती तुमची अभीप्सा आहे ....दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. तिला जागृत करा....जगणे, ही सतत, अखंड चालणारी प्रक्रिया ....जन्म आणि मृत्यू ह्या दोन धृवांमध्ये असलेले अंतर हा संघर्ष आहे...." बीज अंकुरे, अंकुरे रे....ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे, माळरानी, खडकात " (कवी-मधुकर आरकडे ). हा संघर्ष सफल करण्यासाठी....ही कवयित्री म्हणते, " दृढ़ करो प्रेम की अस्मिता ".

                  उद्दालक श्वेतकेतुला जणू सांगतो आहे, " जीवन नहीं है, कोई भूल "  ह्याच्या अंत:करणात, बीज रुपात प्रचंड उर्जा आहे.....संवेदनांचा महासागर आहे. ही मानवी जीवनाची यथार्थ आणि कृतार्थ अशी संस्कृती मुल्ये आहे....नेहा जी म्हणतात, " मनुष्य के अंतरंग में छिपी संपदा विपुल...."                                  बीजामध्ये काहीच दिसत नाही....तेव्हा उद्दालक म्हणतो, परमेश्वर हे तत्व, म्हणजे " प्रेम की अस्मिता " आहे. डोळ्यांना दिसत नाही. पण त्याचे अस्तित्व म्हणजेच मानव हा अविष्कार आहे. नेहा जी म्हणतात, " जीवन नहीं है कोई भूल ". असंख्य निसर्ग चक्रातील मानव निर्मिती ही अशीच एक " अंकुरण की ओशोमय श्रृंखला " आहे. हे बीजांकुरण आहे, "प्रेम की अस्मिता " चे आहे; " जीवन संघर्ष " हे प्रसव संवेदनांचे स्फुरण आहे.

                     हे बीज अंकुरे, अंकुरे....ओल्या मातीच्या कुशीची ' अभीप्सा ' आणि  'प्रेम की अस्मिता " घेऊन "  जीवन संघर्ष " करीत आहे. त्याला जन्म आणि मृत्यू यांना जोडणारा " संवेदना पूल " हवा आहे...तरच मनुष्यत्व ' संभावना ' ह्या परिप्रेक्षातून बाहेर पडून..... " बीज है मगर फूल नहीं " मधून म्हणजे   " माळरानी, खडकात " जे सत्व आहे.....ते रुजून फुल होऊ शकेल.

                     नेहा भांडारकर यांची ही सघन, आशय संपन्नता... समग्र कवितेच्या शब्दाशब्दांत स्त्रवत जाणारी महान जाणीव आहे.....खरं तर हा माझ्या मानवी-जीवन जाणीवेचा एक प्रवास त्यांनी इथे रेखाटला आहे. हा प्रवास मी मांडण्याचा केवळ प्रयत्न केला आहे.....धन्यवाद !

                                               **************

Saturday, 22 August 2020

हिंदुत्व म्हणजे काय ?

                                                         हिंदुत्व म्हणजे काय ?

                            Why I am a Hindu ? मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आहे, ह्याचा अत्यंत विस्तृत उहापोह शशी थरूर यांनी ह्या इंग्रजी पुस्तकात केला आहे. हा विषय त्यांनी तीन भागात विशद केला आहे. भाग १- हिंदुत्व म्हणजे काय. भाग २- हिंदुत्वाचे राजकारण. भाग ३- आधुनिक परिप्रेक्षातील हिंदुत्व.

                           शशी जी, प्रस्तावनेतच हे स्पष्ट करतात की हिंदुत्व हा रूढार्थाने हिंदू हा धर्म नसून एक महान तत्वज्ञान आहे. म्हणूनच हिंदुत्व हे कुठल्याही एका पवित्र धर्म ग्रंथाचे सूत्र नाही. हिंदू हा जर धर्म म्हणून मान्य करायचा असेल तर ह्या धर्मात देवादिकांचे जेव्हढे महत्व आहे, म्हणजे आस्तिक हे तत्व मान्य केले आहे; तेव्हढेच देवाचे अस्तित्व अमान्यही केले आहे, नास्तिक ह्या संप्रदायामार्फत. हिंदूंमध्ये जैन, बौद्ध, शीख तत्वज्ञान इतके स्पष्ट आणि मान्य केले गेले आहे की ह्या परंपरा म्हणजे हिंदुत्वाच्या उपशाखा मानल्या गेल्या आहेत आणि संविधानाच्या चौकटीत ह्या परंपरा हिंदुत्वातच समाविष्ट मानल्या गेल्या आहेत.

                             आस्तिक हिंदुत्व षडदर्शन संहितेच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहे; तर नास्तिक हिंदुत्व बौद्ध, जैन, शीख ह्या परंपरांशिवाय चार्वाक आणि मिताक्षर परंपरांतून स्पष्ट होते. वेद-उपनिषदे आणि आरण्यके ह्या ग्रंथांतून आस्तिक परंपरा वर्णन केलेली आहे. महाभारत आणि रामायण हे ग्रंथ धर्म ग्रंथापेक्षा अधिक नीती-अनीती, राजधर्म, कर्तव्य, हिंसा इ अनेक तत्वांचे अवलोकन, चिकित्सा, आणि चिंतन-मनन करणा-या कथा आहेत.

                               केन उपनिषदाने म्हणले आहे की हिंदुत्व ही संकल्पना आणि तत्वज्ञान अशा लोकांना समजावून सांगणे सोपे आहे; ज्यांना हिंदुत्व म्हणजे काय, हे मुळातच समजत नाही. म्हणजे असं की जे हिंदू नाहीत, त्यांना हिंदुत्व समजावून देणे, सोपे आहे. पण जे हिंदू असून हिंदुत्व काय हे जाणत नाहीत; त्यांना हिंदुत्व म्हणजे काय, हे समजाविणे, अवघड आहे. 

                             ह्या संदर्भात एक गोड कथा सांगितली जाते. ती अशी - एका तत्वज्ञ ऋषींना परमेश्वर म्हणजे काय, हे समजावून सांगा, असे काही नास्तिक लोक म्हणाले. त्यावर ते काही न बोलता मौन झाले. त्यांच्या शिष्यांनी आणि नास्तिकवादी लोकांनी खूप आग्रह केल्यावर ते म्हणाले, " मौन, शांतता, ध्यानस्थ अवस्था हेच ह्याचे उत्तर आहे. कारण परमेश्वर शांत, निरामय आणि ध्यानस्थ अशी माणसाची खरी अवस्था आहे आणि ह्याच अवस्थेमध्ये ईश्वर, देव, परमेश्वर, आत्मा इत्यादिंचे समग्र ज्ञान संपादन होत असते."

                                                                 *************


                       

Friday, 21 August 2020

वास्तव आणि गृहितक

                                                              वास्तव आणि गृहितक 

गृहितक आणि वास्तव ह्यांचे दरम्यान काय अंतर आहे? गृहितक म्हणजे सुविहित पध्दतीने विचार मांडणे, आणि निर्णयाप्रत जाण्यासाठी काही ढोबळ निष्कर्ष काढणे. वास्तव ही एक वस्तुस्थिती आहे; आणि गृहितकाशी फारकत घेऊनच वास्तव समजून घेता येते. म्हणजेच असं की गृहित गोष्टींचा त्याग करूनच वास्तव नीटपणे समजून घेता येते. कारण वास्तव हे प्रथम दर्शनीच स्विकार करायचं, असं सत्य आहे आणि स्वीकारा नंतरच आपण वास्तवाला समजावून घेऊ शकतो, हे मुलभूत सूत्र आहे. 

                      पण वास्तव समजून घेण्यासाठी प्रथम आपल्या अहंकाराला हाकलून द्यावे लागते. कारण वास्तवाशी सामना करण्यासाठी फक्त वस्तुनिष्ठ विचारच आवश्यक असतात. अखेर असं आहे की वास्तव आणि गृहीतक यांच्या दरम्यान परस्पर अवलंबित्व नाहीयेय. वास्तव हे सत्य दर्शन आहे, तर गृहितक हे एक समस्यांचा मुकाबला करण्याचे साधन आहे. कधीही वास्तव ही एक समस्या आहे, असे समजून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणे, हे स्वत:ला गोंधळात टाकणारे माप आहे. वास्तव हे जीवनाचे अभेद्य सत्य आहे आणि ते आहे तसं स्वीकारण्याचे जे नाकारतात, त्यांना वास्तव ही समस्या वाटते.

                        वास्तवाचे सम्यक ज्ञान गृहितकावर आधारलेले नसते, कारण वास्तवाचे विश्लेषणात्मक अवलोकन करण्याचे भूतकाळातील अनुभव हे सूत्र आहे. म्हणूनच गतकाळातील सत्यामुळे... सत्य गोष्टींच्या आधारे पूर्वग्रहदूषित मते बनविणे, योग्य नव्हे. पण भूतकाळ म्हणजे इतिहास आणि इतिहास हे सम्यक ज्ञान असून त्याचा उपयोग वास्तववादी सत्याचे समग्र अवलोकन करण्यासाठी निश्चित आवश्यक आहे.

                                                              ******************