Sunday, 23 August 2020

हे प्रीय - एक कविता

 छांद्योग्य उपनिषदात एक गोड गोष्ट आहे.  उद्दालक आपला पुत्र, श्वेतकेतुला पिंपळाच्या झाडाची फळे काढून आणायला सांगतो. मग ती फळे कापून बिया काढायला सांगतो. शेवटी बिया फोडून आत काय आहे, हे विचारतो. श्वेतकेतू म्हणतो, " बियांच्या आत बियांचेच बीजमय पदार्थ कण दिसत आहेत. " तेव्हा उद्दालक म्हणतो, " बियांचे आत बीजकण म्हणजेच बियाच दिसतात ना ! पण त्यांच्यात असलेली प्रचंड शक्ती दिसत नाहीयेय. ही शक्तीच महान, प्रचंड वृक्ष निर्माण करते." 

                        हे प्रीय ह्या हिंदी कवितेत नेहा भांडारकर म्हणतात, " बीज में ताकद है वृक्ष बोनेकी " मानवी जीवन असेच महान आहे. हे प्रीय.....ये मानवा, माझ्या प्रीय बांधवांनो, तुमच्यामध्ये असेच बीज आहे..... ती तुमची अभीप्सा आहे ....दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. तिला जागृत करा....जगणे, ही सतत, अखंड चालणारी प्रक्रिया ....जन्म आणि मृत्यू ह्या दोन धृवांमध्ये असलेले अंतर हा संघर्ष आहे...." बीज अंकुरे, अंकुरे रे....ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे, माळरानी, खडकात " (कवी-मधुकर आरकडे ). हा संघर्ष सफल करण्यासाठी....ही कवयित्री म्हणते, " दृढ़ करो प्रेम की अस्मिता ".

                  उद्दालक श्वेतकेतुला जणू सांगतो आहे, " जीवन नहीं है, कोई भूल "  ह्याच्या अंत:करणात, बीज रुपात प्रचंड उर्जा आहे.....संवेदनांचा महासागर आहे. ही मानवी जीवनाची यथार्थ आणि कृतार्थ अशी संस्कृती मुल्ये आहे....नेहा जी म्हणतात, " मनुष्य के अंतरंग में छिपी संपदा विपुल...."                                  बीजामध्ये काहीच दिसत नाही....तेव्हा उद्दालक म्हणतो, परमेश्वर हे तत्व, म्हणजे " प्रेम की अस्मिता " आहे. डोळ्यांना दिसत नाही. पण त्याचे अस्तित्व म्हणजेच मानव हा अविष्कार आहे. नेहा जी म्हणतात, " जीवन नहीं है कोई भूल ". असंख्य निसर्ग चक्रातील मानव निर्मिती ही अशीच एक " अंकुरण की ओशोमय श्रृंखला " आहे. हे बीजांकुरण आहे, "प्रेम की अस्मिता " चे आहे; " जीवन संघर्ष " हे प्रसव संवेदनांचे स्फुरण आहे.

                     हे बीज अंकुरे, अंकुरे....ओल्या मातीच्या कुशीची ' अभीप्सा ' आणि  'प्रेम की अस्मिता " घेऊन "  जीवन संघर्ष " करीत आहे. त्याला जन्म आणि मृत्यू यांना जोडणारा " संवेदना पूल " हवा आहे...तरच मनुष्यत्व ' संभावना ' ह्या परिप्रेक्षातून बाहेर पडून..... " बीज है मगर फूल नहीं " मधून म्हणजे   " माळरानी, खडकात " जे सत्व आहे.....ते रुजून फुल होऊ शकेल.

                     नेहा भांडारकर यांची ही सघन, आशय संपन्नता... समग्र कवितेच्या शब्दाशब्दांत स्त्रवत जाणारी महान जाणीव आहे.....खरं तर हा माझ्या मानवी-जीवन जाणीवेचा एक प्रवास त्यांनी इथे रेखाटला आहे. हा प्रवास मी मांडण्याचा केवळ प्रयत्न केला आहे.....धन्यवाद !

                                               **************

No comments:

Post a Comment