(1) बुद्धीच्या आयमातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे निर्मन होणे किंवा निर्मळ होणे, आहे. बुद्धी हा मानवी यष्टीचा उत्क्रांत
होण्याचा क्रम आहे. तर बुद्धीच्या आयमातून बाहेर पडण्याचा प्रयत्न हा समष्टीचा
विकास करण्याचा प्रयत्न आहे. संतांनी
हेच साध्य केले, म्हणून ते इतके निर्मळ झाले की बुद्धी
आणि मन ह्या द्वंद्वातून ते मुक्त झाले.
निर्द्वंद्व
होणे आणि अद्वैताचा साक्षात्कार होणे, ह्या
एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
************
(2) माणूस
म्हणून मला माझी प्रतिष्ठा आहे व ती जपण्याचा माझा अधिकार कोणीही कायदाबाह्य
पद्धतीने हिरावून घेऊ शकत नाही. तसा यशस्वी प्रयत्न जो कोणी करेल, तो मानवी हक्क भंग कायद्याचा अपराधी असेल.
मला बेजबाबदारपणे अटक करून 68 दिवस पोलीस कस्टडी व तुरुंगवास भोगावा लागला.
कोर्टात मात्र माझ्या विरुद्ध लावलेलं एकही कलम पोलिसांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न
सुद्धा केला नाही, म्हणून कोर्टाने मला निरपराध म्हणून
जाहीर केले.
*********
(3) पाप
हा अनेक दुर्गुणांचा समूह नाही. एकच वाईट कृत्य पाप असू शकते. पण पुण्य मात्र अनेक चांगल्या गोष्टींचा, अहंकार शून्य एकत्रित समूह असतो. एकच चांगली
गोष्ट किंवा कृत्य म्हणजे पुण्य नव्हे.
ह्याचे कारण असे आहे की चांगली वर्तणूक, चांगल्या गोष्टी करणे, सत्शील वागणे ह्या सर्वसामान्य गोष्टी आहेत.
त्या सर्वच गोष्टी सर्वांकडे नसतात. पण ह्यातील एखादी तरी नक्कीच असते. कारण
मनुष्य जन्म हा अशाच एखाद्या सद्गुणांच्या प्रभावामुळे मिळत असतो.
म्हणूनच
संपूर्ण पुण्यवान माणूस ही व्यक्ती नसते, ती
अभिव्यक्ती असते. पण अंशतः पापी माणूस हा संपूर्ण पापी माणसापेक्षा वेगळा नसतो.
*************
(4) लॉक डाउन न होऊ देणे.. हे जितके irrational, तर्क शून्य आहे;
तितकेच
ते होऊ देणे irrational तर्क शून्य आहे... ह्या सर्व phenomena प्रकारामध्ये absurdity
विवेकशून्यता
आहे. सर्व जगाचे व्यवहार बंद पाडणे.... एका अदृश्य शत्रूला मारण्यासाठी.. आणि
त्यासाठी शस्त्र काय? तर घरामध्ये स्वत;ला.. सर्वांना स्थानबद्ध करणे..
जगरहाटी बंद ठेवायची आणि शत्रूचा नायनाट करायचा.. जे बळी पडले आहेत, त्यांतील
जायबंदी, जखमी. वाचवायचे.. आणि न वाचलेल्यांची काळजीपूर्वक विल्हेवाट
लावायची.. बाकी सर्व स्तब्ध ! पण इतरांना जगायचे आहे म्हणून त्यांच्यासाठी
जीवनावश्यक व्यवस्था चालू ठेवायच्या. ह्या वरून लक्षात येतं.. लोकांना जगवायचं,
हा
सुद्धा केव्हढा मोठा कारभार आहे.. व्यवस्था आहे..
ह्या पलीकडे जाऊन आपल्याला काय हवं असतं? स्वातंत्र्य..
नेमकं हेच.. खरे जीवनमूल्य आहे.. जे गमावल्या मुळे आपण जे जगतो आहोत, ते
किती नीरस, बेचव आणि घुसमट करणारे जगणे आहे ! स्वातंत्र्याची किंमत अशा प्रकारे
अनुभवायला मिळत आहे.. काश्मीर मध्ये तर लादलेले पारतंत्र्य.. स्थानबद्ध.. किती
घुसमटविणारं असेल ???
**************
(5) गिरीश कुबेर यांनी एक मार्मिक आणि अचूक अवलोकन केलं आहे की " ज्यांचे अशक्त विचार आहेत; तेच सशक्त प्रचार करीत असून त्याला सामान्य लोक बळी पडत आहेत."
**************
(5) गिरीश कुबेर यांनी एक मार्मिक आणि अचूक अवलोकन केलं आहे की " ज्यांचे अशक्त विचार आहेत; तेच सशक्त प्रचार करीत असून त्याला सामान्य लोक बळी पडत आहेत."
****************
No comments:
Post a Comment