Friday, 24 September 2021

स्वातंत्र्य.. एक जीवनमूल्य

नरहर कुरूंदकरांनी स्वातंत्र्य ही संकल्पना नाही, असे म्हणले आहे. कारण  स्वातंत्र्य हे मानवी सांस्कृतिक विकासाचे अनुस्यूत असे मूल्य आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव आणि स्वैर वर्तन नव्हे. मनमानी नव्हे. म्हणून कुरूंदकर म्हणतात, जबाबदारीच्या जाणिवे शिवाय स्वातंत्र्य हे असूच शकत नाही.
                सामूहिक जनजीवन हे कौटुंबिक आणि सामाजिक वास्तव आहे. ह्यापालिकडे माझी भाषा, माझा धर्म, माझी जात-पात आणि अखेर माझा देश किंवा राष्ट्र ह्या वास्तविकता आहेत. हा मानवी जगण्याचा वास्तववादी परिप्रेक्ष आहे. पण जेव्हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा माझे मन आणि बुद्धी ह्यांचे कार्य दोन पातळीवर चालते. एक पातळी आहे, माझे मी पण.. जीव म्हणजे जिवंत राहणे, हे आहे. तिथे जीवाला भीती असेल तर मी जगण्यासाठी काहीही तडजोडी, अगदी गुलामगिरीही पत्करायला तयार असतो. तुरुंगवास ही शिक्षा का आहे.. ह्याचे उत्तर ह्यातच आहे की मरण्यापेक्षा जगणे स्वीकारले जाते, तेव्हा अस्तित्व महत्वाचे असते. म्हणून मग माझ्या स्वातंत्र्याचा बळी मी देत असतो. तुरुंगवास ही शिक्षा असते, कारण मी माझ्या स्वातंत्र्याचा बळी देऊन गुलामगिरी स्वीकारलेली असते. ही मला झालेली शिक्षा स्वातंत्र्याचा बळी दिल्याबद्दल असते.
                  नोकरी-चाकरी हा सुद्धा स्वातंत्र्याचा बळी असतो. कारण जगण्याचे एक संसाधन म्हणून मी नोकरी पत्करतो, तेव्हा एका विशिष्ट व्यवस्थेचे दास्य म्हणजे गुलामगिरी मी मान्य करीत असतो. म्हणूनच कोणत्याही व्यवस्थेमध्ये.. आणि ह्यामध्ये जगण्याची, जीव जगविण्याची व्यवस्था सुद्धा येते.. स्वातंत्र्य संकुचित असते. त्याचबरोबर, उरलेले स्वातंत्र्य टिकविणे ही एक जबाबदारी असते. नाहीतर मी व्यवस्थे बाहेर फेकला जातो. हयात जगण्याची व्यवस्था असल्यामुळे माझ्या अस्तित्वाचा, जगण्याचा प्रश्न उभा राहतो. म्हणून असे स्वातंत्र्य हे विशिष्ट व्यवस्थेच्या परिप्रेक्षातच, त्या व्यवस्थेच्या बंधनात, नियम, कायदे,इ इ च्या चाकोरीतच सत्य असते. सत्य हे आहे की स्वातंत्र्य हे जीवनमूल्य म्हणून मान्य करायचे असेल, तर अस्तित्वाचे प्रश्न नुसते बाजूला ठेवून चालत नाही. तर अस्तित्वा  पेक्षा महान असे मूल्य आहे, हे मान्य करावे लागते. तिथेच  स्वातंत्र्य ह्या मूल्याची चिकित्सा होऊ शकते.
                     मानवी विकास हा एक सांस्कृतिक जीवनाचा प्रवास आहे. इथे माणूस ही व्यक्ति, व्यष्टी, जीव, किंवा आकार असलेला प्राणी नाही. इथे माणूस हे समष्टी तत्व आहे. त्यामुळे जगणे, माझे अस्तित्व ही समस्या नाही किंवा वास्तविकता नाही. अस्तित्व हा प्रश्न एकदा निकालात निघाला की मग स्वातंत्र्य ह्या शब्दाला सांस्कृतिक  मूल्य म्हणून अर्थ प्राप्त होतो. कारण स्वातंत्र्य ही आदर्शवादी जीवनाची मांडणी आहे, रचना आहे, आणि म्हणून व्यक्ति स्वातंत्र्य अशी कोणतीही संकल्पना असू शकत नाही. व्यक्तीला मिळणारे स्वातंत्र्य हे नेहमीच सापेक्ष असते. काळ आणि परिस्थिति हे एक ह्या स्वातंत्र्याचे परिमाण आहे, तर दुसरे परिमाण मानव्यतेचे आहे. मानवी परिमाण म्हणजे समष्टी तत्व.. आदर्शवाद ही ह्या तत्वाची रचना आहे आणि मांडणी ही एक व्यवस्था आहे. उदा लोकशाही राज्य ह्या संकल्पनेच्या विवध रचना.
                         मुळात लोकशाही म्हणजे हुकुमशाही नाही.. असे म्हणणे किंवा मानणे, हे समजून घेण्याचे एक सुलभीकरण आहे.     

No comments:

Post a Comment