Friday, 24 September 2021

विषमता- वस्तुस्थिती की परिस्थिती ?

 परिस्थितीचा फार बाऊ करून आपल्या अपयशाचे समर्थन करणे, ही आता आता फॅशन झाली आहे. पण हे लक्षात घेतले पाहिजे की माणसाची बुद्धिमत्ता व destiny प्रारब्ध हे परिस्थितीवर अवलंबून नसतं. कारण परिस्थिती माणसापेक्षा मोठी नाही. बौद्धिक विषमता हे जसे बरेचसे नैसर्गिक वास्तव आहे; तसे आर्थिक विषमता आणि समान संधी उपलब्ध नसणे, हे भौतिक वास्तव परिस्थितीजन्य नसून मानवी विकास क्षमतेचे मूलभूत तत्व आहे; म्हणून ते वस्तुनिष्ठ आहे, असं म्हणलं जाते. समान संधी मिळाल्या तरी बौद्धिक, मानसिक व आधिभौतिक क्षमतांची विषमता राहणारच. कारण सर्वांच्या गुण विकास क्षमता एकच, समान नाहीत आणि म्हणूनच मानवी प्रयत्नवादाला पर्याय नाही, पण अर्थ मात्र मर्यादित आहे.

यशामध्ये परिस्थितीचा वाटा असतो; पण तो 100% नसतो. कारण यश आणि अपयश हे 80-90 टक्के घडत असतं. म्हणून असं म्हणतात की यश-अपयशाचे आपण मालक नसतो. तर ' धनी ' म्हणजे वाहक carrier असतो. तर मग आपले कर्तृत्व.... उरलेले 10-20 टक्के एव्हढेच असते. जो माणूस स्वत:चे कर्तृत्व १००% आहे, असे मानतो; तो एकतर अहंकारी असतो किंवा थापाड्या, बालिश असतो. तर्कशास्त्र सुद्धा यशाच्या शक्यतेचे मोजमाप जास्तीत जास्त ५०% च करते. त्यापेक्षा अधिक यश कर्तृत्वाने मिळू शकते. पण ते १००% कधीच असू शकत नाही.

जर सर्वांना समान परिस्थिती, समान संधी उपलब्ध करून दिली तरीही विषमता दूर होणार नाही. कारण तिथे मग ‘ बळी तो कान पिळी ‘... हिंसा सामर्थ्य, सत्ता सामर्थ्य, भ्रष्टाचार इ मानवी दुर्गुण, धर्मश्रेष्ठ होऊन जातात.
राजकीय म्हणजे सत्तेच्या जोरावर यश मिळू शकते, पण ते मर्यादित असते. कारण असे यश कृत्रिम म्हणून अशाश्वत असते. डॉ आंबेडकरांना मिळाले यश हे त्यांना मिळालेल्या केवळ संधीवर, परिस्थितीवर नाही मिळालं. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर व आधिभौतिक (पूर्वजन्मातील पुण्यसंचय) बळावर मिळाले.
मानवी संस्कृतीने ही विषमता दूर करण्याचा प्रयत्न करणे, हा सुद्धा मानवी विकसनशीलतेचा अनिर्वाय भाग आहे. म्हणून आरक्षण हवे आहे, पण आता तो भस्मासुर, अनिर्बंध, राजकीय मुद्दा झाल्यामुळे मूळ मानवी विकासाचे तत्व, सामाजिक न्याय हे तत्व counter productive झाले आहे. म्हणजे असं की अर्थ शास्त्राच्या सिद्धांतानुसार एखादी गोष्ट अमर्यादित वाढली तर ती Reverse Return व्यस्त परतावा देऊ लागते. गणिताच्या भाषेत... सर्व किंवा काही घटकांचे प्रमाण अमर्याद वाढत गेले, तर परतावा व्यस्त होऊन जातो. मूळचे सम प्रमाण व्यस्त होऊन जाते.
प्रयत्न करणे, हे माणसाच्या क्षमतेवर पण आवाक्यात आहे, पण त्याला यश किती मिळावं, हे प्रयत्नांच्या मर्यादेवर किंवा क्षमतेवर अवलंबून नाही.
कर्मण्येव अधिकारास्ते । मा फलेशु कदाचन ।। - भ.गीता
कर्म करणे, प्रयत्न करणे, हा तुझा अधिकार आहे, त्याला यश द्यायचं की नाही आणि दिले तरी किती; हा माझा अधिकार आहे. इथे मी म्हणजे श्रीकृष्ण हा देव नसून कृष्ण ह्या व्यक्तीची समष्टी आहे’ व्यष्टीचा समष्टीभूत अविष्कार आहे.
*************

No comments:

Post a Comment