Thursday, 9 November 2023

स्वातंत्र्य म्हणजे काय ?

स्वातंत्र्य ही संस्कृती आहे काय? स्वातंत्र्य हे जीवन मूल्य आहे काय?
अनिर्बंध स्वातंत्र्य ही संस्कृती नाही आणि जीवनमूल्य ही नाही. 
              निर्बंध कोणते योग्य आणि कोणते अयोग्य ह्याचे विश्लेषण देशाचा इतिहास, जगाचा इतिहास वाचून होते. आपले रामायण - महाभारत इत्यादी ग्रंथ रचणारे वाल्मिकी - व्यास आदी ग्रंथकारांनी मानवी भाव - भावनांच्या बरोबर तत्कालीन इतिहासाची चिकित्सा केलेली आहे आणि आजही इतिहासची आणि ह्या ग्रंथांची चिकित्सा विविध प्रबंधातून, अभ्यास सत्रांतून होत असते. न्याय संहिता आणि न्याय तत्व ह्या दृष्टीने संविधान हा ग्रंथ आणि त्यानुसार कार्य करणारी न्यायालये ही सुद्धा सत्य संशोधनाची साधने आणि व्यवस्था आहेत.
              राम -रावण, कौरव - पांडव, देव - दैत्य अशी रचन मांडून व्यास - वाल्मिकी ह्यांनी सुष्ट - दुष्ट, योग्य - अयोग्य, नैतिक - अनैतिक ह्या आणि इतर विविध आणि अनेक द्वन्व्दांवर भाष्य केले आहे. 
              सत्य हे असे विविध रंगांनी, विविध भाव - भावनांनी, विविध नात्यांनी रंगलेले आहे. ह्या सर्व किंवा अशा पैलूंच्या आधाराने, अभ्यासाने, संशोधनात्मक सखोल चिंतनशील विचारांमुळे सत्याची अमूर्त, गूढ आणि संदिग्ध बाजू कळू लागते, असे मला वाटते. निखळ सत्य हा आदर्शवाद आहे; म्हणूनच ह्या आदर्शवादाचे परिशीलन, आकलन हा सत्य जाऊन घेण्याचा अखंड वसा मानवाने घेतलेला आहे.
 ************ 
       

Monday, 19 June 2023

 My Scientific Papers - From thesis of my M. Sc. 

(1)Effects of ascorbic acid on in vitro cultivation of H. diesingi eggs.

Authors

Gosavi, A. V.; Renapurkar, D. M.; Kulkarni, A. B.

Journal-Bulletin of Haffkine Institute 1980 Vol. 8 No. 1 pp. 15-20

Record Number-19840816107

Abstract

Eggs dissected from the ovaries of Hammerschmidtiella diesingi were incubated in Locke's solution containing 0.1% (w/v) DL-ascorbic acid. The presence of ascorbic acid enhanced embryonic development, significantly so between 8 and 42 h of incubation. Thereafter the cultures were similar to those which lacked ascorbic acid. At 36 h, 60% of the eggs incubated with ascorbic acid were at the active embryonic stage, whereas in control cultures at this time only 10% were at this stage and 60% were at the pre-active embryonic stage.

 

(2) Oxygen uptake studies on hammerschmidtiella diesingi.

Gosavi, A. V.; Renapurkar, D. M.; Kulkarni, A. B., 1978-Bulletin of Haffkine Institute 6(3): 73-78

 

In chemotherapeutic treatment of helminthiasis, sensitivity of parasite to anthelmintic drugs depends to a large extent on parasite's metabolic pathways, which may be primarily either aerobic or anaerobic. But it has been difficult to understand the ability of some of the worms to derive energy aerobically and anaerobically. Anthelmintic drugs affect particularly carbohydrate metabolism which holds the key role as the source of energy in helminth parasites. Studies on carbohydrate metabolism of helminths have shown 2 main metabolic pathways. One pathway shows predominance of glycolytic, as the entire source of energy; in the other, the glycolytic pathway is shuttled at phosphoenol pyruvate stage to oxaloacetate and malate through CO2 fixation. Some biochemical features of carbohydrate metabolism 11 parasites were studied. A simple invertebrate host-parasite model of Periplaneta americana and its nematode parasite, H. diesingi was developed for the preliminary studies. The O2 uptake study on H. diesingi was carried out by using Warburg manometric techniques. Intact worms and homogenates were incubated for 3-8 h in glucose, pyruvate and acetate substrates. The O2 uptake was equivalent with these substrates. In sugars, more in galactose than glucose and mannose was found. The significance of these results were discussed.

(3) Effect of coconut milk on in vitro embryonic development of Hammerschmidtiella diesingi, Leidy Nematoda: Thelastomatidae

Gosavi, AV.; Renapurkar, DM.; Kulkarni, AB., 1981: Effect of coconut milk on in vitro embryonic development of Hammerschmidtiella diesingi, Leidy Nematoda: Thelastomatidae. Biovigyanam, 72: 187-189

 

(4) Infection patterns in multiple species of nematodes parasitic in Periplaneta americana L

Renapurkar, DM.; Gosavi, AV.; Arekar, AS., 1994: Infection patterns in multiple species of nematodes parasitic in Periplaneta americana L. Indian Journal of Helminthology. 1993( ); 451-2: 54-63.

                                                              **************

Friday, 17 June 2022

The Mystical Nepal- IRCTC Tour- 12 th June to 17 th June 2022.

 The other day, as I was talking with our IRCTC Group of Nepal Tour, I quoted some great philosopher who said : Journey is more important than destination. The Tourist who come for viting various places in Tour have to be more conscious about what they have  learned, understood about the people living therein. The various places mentioned in intinery are not destinations to be covered but the beauty of surrouding places, the people, their culture, there affectionate behaviour, keen sense of brotherhood - sisterhood amongst each other.....so many things and factors of world around there are really our destinations. Of course, there are tourist who check in itinery list and become restless when some the places are missed out and then they start shouting, making noise, complaints and so on. This is so because they are interesd not in tour but in administration of tour ! 

                            Our recent tour conducted by IRCTC to Nepal has been a good example for me. Majority of participants were senior citizens and as such experienced and matured enough not to get involved in nonsensical verbatism as well as untoward behaviour. All had one aim : to enjoy the days of tour amoungst ourselves and not grumble about this and that. This healthy and jovial approach and participation of all made the tour a memorable event and occasion. 

                          Our visits to Pashupatinath Temple, Swayambhu Sthupa, Kamandevi Temple and Vidhyavasini Mandir and caves were main features of the tour. All these places halped us to learn synthesis of  Hindu - Bouddhya - Nepali culture. The marvel of art in stones, the pictorial depiction of various episodes of history, the then life of people and above and overall, the breath taking beauty of skies above. The panoramic plays of clouds spread and dispersed over mountains had special appeal not only to our mobile cameras but to our sense enjoyment and appreciation in beauties of nature. Sometimes, I used to forget the mobile as I got captured in seeing, feeling and absorbing the asthetics of beautiful nature.

                        As the final day of Tour conclusion arrived, we all had become sentimental. The treaturous, extremely diffucult, serpentine mountanous ways were as challenging to our vision as or pehaps more to our Bus driver and his cleaner assistant.  Both of them manuovered the bus so skillfully that in spite of being fear stricken, this duo of driver - cleaner did not betray our confidence in their competency to lead us safely throught out the Mystical Nepal Tour. So,we made a sizable collection of money as a Reward to appreaciate and handed over the same to them along with our Tour guide who with his, though little strained patience, made our tour informative and well organized. Most of us being senior citizens, he made it a point to attend and address their difficulties. The ladies and other youngsters, very few by numbers, but ably supported and without getting "bored" assimilated themselves as a beatiful team to enjoy the tour. The childishness, childish jokes, the singing plays of Antakshari, etc were funny part of tour. The self introduction was most memorable because it brought us more closure, each one of us, as a unique identity. This personal identity revealed intimate facts of individualities and the courageous response given by such person to hardships, difficulties of life and found the way to lead the life to the place of satifaction. 

                 Finally, but not the least, is the support and help extended by IRCTC staff in Mumbai, especially by Ms Manasi and Ms Yayati had been excellent. The hotel, food and other facilities and actually the basic needs in tour had been well arranged within the policy dictates and the budget. 

                 I, Anand Gosavi, on behalf of all participants of Tour thank all and hope to meet again in one tour or other, one day or other. 

                                                *************

Monday, 6 June 2022

स्त्री आणि पुरुष

 स्त्री - पुरुष संबंध हा एक मानवी उत्क्रांती मधील एक महत्वाचा टप्पा आहे. मुळात हा संबंध नर - मादी असा निर्माण झाला. उत्क्रांतीच्या एका पुढील टप्प्यावर मादीचे सृजनशीलतेचे अंग लक्षात आल्यावर कुटुंब संस्था टोळीच्या स्वरूपातून विकास पावून घर ह्या संस्थेत रुपांतरीत झाली आणि स्त्री - पुरुष हे नाते निर्माण झाले. कुटुंब - घर ह्या संस्था पुढे आणखी विकसित होऊन समाज आणि त्या बरोबर धर्म ही संस्था निर्माण झाली. धर्माचरण म्हणजे एक जीवन पद्धती विकास पावली आणि उत्तरोत्तर धर्माचा प्रभाव वाढत जाऊन राज्य संस्था आणि धर्म ह्यांनी समाज व्यवस्था निर्माण केली. सत्ता संघर्ष, समाज, आणि राजकारण ह्यांच्या गुंतागुंतीतून मानवी जीवन हे एक शैक्षणिक  परिक्षेत्र उदयाला आले. 

                      राज्य संस्था, राजकारण आणि मानवी सत्ताकांक्षा ह्यातून आर्थिक व्यवहार विकसित झाले. व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राजकारण ह्यांच्या विकासातून मानवता, साहित्य, कला आणि शिक्षण ह्यांचा प्रचार आणि प्रसार झाला. यंत्र विकासातून आधुनिकता आली आणि आधुनिकता वादातून आजचे स्त्री - पुरुष नाते कुटुंब ह्या परिघासह जागतिकीकरणाच्या प्रवाहात अत्यंत ताणले गेले आहे. हा ताण कुटुंब संस्थेवर इतका पडला आहे की कुटुंब ही संकल्पना क्षीण होऊन...केवळ स्त्री

-पुरुष नात्यांचेच नाहीतर संपूर्ण मानव वंशाचे वस्तूकरण होऊ लागले आहे. युद्ध, हिंसा, सत्ता, आर्थिक प्राबल्य, आणि राजकारण ह्यांच्या संघर्षात माणूस एक वस्तू होऊन गेला आहे. रोबोट आणि माणूस ह्यांतील सीमा रेषा सतत आक्रसत जात चालली आहे. 

                       घर आणि स्त्री -पुरुष ह्यांच्यातील नाते संबंध सैल होत चालले आहे. स्त्री चे पारंपारिक स्थान आणि तिची कौटुंबिक ओळख पुसत चालली आहे. दोघांमधील नैसर्गिक संबंध नात्याच्या परिक्षेत्रात व्यावहारिक होऊन जात आहेत. ह्यातून निर्माण होणाऱ्या विवाह समस्या हे आधुनिक विश्वाचे मानवी जीवनाला आव्हान आहे. घटस्फोट हे विवाहोत्तर वास्तव झाले असून वैवाहिक जीवनाची जोखीम झाली आहे. वैवाहिक जीवन टिकवणे.....हे मानवी स्वभाव आणि नात्यांचे प्रभाव क्षेत्र राहिले नसून आर्थिक आणि व्यावहारिक नात्याचे प्रतिष्ठान झाले आहे. 

                     स्त्रीचे पारंपारिक प्रभाव क्षेत्र घर होते आणि आजही मोठ्या प्रमाणात आहे. पण स्त्रीवाद प्रभावित स्त्रियांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त झाले आहे. कारण पुरुष जितका स्वातंत्र्य आणि अहंकार प्रभावित आहे; तितकीच आजची स्त्री प्रभावित झालेली आहे. प्रत्येकाला आपली स्वतंत्र space म्हणजे अनिर्बंध सत्ता, वर्तणूक आणि स्वातंत्र्य पूर्ण अधिकार हवेत आहेत. पुरुषाच्या जीवाची नाही, पण जीवनाची घर ही एक अस्तित्वपूर्ण संदर्भ चौकट आहे; तर स्त्रीचे स्वत:चे घर हे एक वास्तववादी अस्तित्व आहे. तिचे सुरक्षित वास्तव्य आहे; भावनाशील कर्तृत्व आहे. दोघांचे घर ह्या जाणिवेशी असणारे नाते कुटुंब वत्सल भावनेपेक्षा, संवेदनेपेक्षा अधिक वास्तववादी आहे; आर्थिक आणि व्यावहारिक सोयीचे झाले आहे. 

                        ह्या वस्तुस्थितीमुळे व्यक्ती, कुटुंब, समाज आणि कतृत्व क्षेत्र ह्यांतील तणाव वाढले असून स्त्री - पुरुष दोघांच्या वागणुकीच्या आणि वर्तणुकीच्या मर्यादा सभ्य -असभ्य, प्रतिष्ठित - अप्रतिष्ठित, नैतिक -अनैतिक अशा विविध संघर्षात भरडून निघत आहेत. ह्या संघर्षातून घडत जाणारे परिवर्तन काळजीपूर्वक अभ्यासले पाहिजे. नवीन जीवन मूल्यांची जडणघडण हे काळाचे आवाहन आणि आव्हान आहे.

                                                                 **************

Wednesday, 19 January 2022

सहानुभूती आणि सहसंवेदना

 अडम स्मिथ च्या The Theory of Moral sentiments ह्या ग्रंथाच्या पहिल्या भागात  सहानुभूती (sympathy) आणि सहसंवेदना (empathy) ह्या मानवी भावनांचे विस्तृत विश्लेषण आहे.

                सहानुभूती ही भावना स्वत:साठी दुसऱ्यांकडून अपेक्षित असते, तेव्हा आपली विचारांची पातळी खूप उथळ असते. कारण स्वत:साठी काहीही मागताना आपण नि:पक्षपाती नसतो. मुळात मी- पणा म्हणजे अहंकार हा जितका सूक्ष्म आहे, तितक्या प्रमाणात आपली सहानुभूतीची मागणी सखोल असते. पण सर्वसामान्यपणे, अहंकार दडविण्याचा किंवा झाकून ठेवण्याची आपली प्रवृत्ती असते. त्यामुळे,आपली विचारांची पातळी उथळ असते. अहंकाराची जाणीव सहसा होत नसते. कारण पुन्हा हेच की अहंकार सूक्ष्म आहे. दुसरे असे की आपण बहुसंख्य बाबतीत, अहंकाराला वेगवेगळ्या संकल्पना चिकटवून अहंकाराची जाणीव अज्ञानमूलक करत असतो. म्हणजे असं की आत्मकेंद्रित विचारसरणी किंवा स्वाभिमान, स्वानुभूति, तत्वाचा प्रश्न, अहंगंड, गर्व, उद्धटपणा, उर्मटपणा इत्यादी स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आपल्याला सर्व अहंकाराच्या ह्या विविध रूपांची  जाणीवच होत नाही किंबहुना आपण आपल्या विचारांची इतकी सखोल चिकित्सा करत नाही. 

                    सहानुभूती स्वत:साठी जेव्हढ्या तीव्रतेने आपण मागतो, तेव्हढी तीव्रता दुसऱ्यांच्या बाबतीत किंवा दुसऱ्या करिता आपण बाळगत नाही. तरीही  जेव्हा स्वत: पलीकडे जाऊन दुसऱ्यांच्या बद्दल आपल्याला सहानुभूती वाटू लागते, तेव्हा आपली मानसिकता काय असते? ह्याबद्दल अडम स्मिथ सखोल विश्लेषण करताना म्हणतात," The idea of utility of all this kind, is plainly an after thought". सहानुभूती हा पश्चात विचार आहे. दुसऱ्या बद्ल कळवळा, संवेदनशील असणे आणि मदत करण्याची इच्छा...ह्या गोष्टींचा विचार सहानुभूतीतून निर्माण होतो आणि मुख्यत: सदर भावना वैचारिक पातळीवर होत असते. प्रत्यक्ष काहीही कृती मात्र आपण लगेच करत नसतो. म्हणूनच सहानुभूती ही पश्चात बुद्धी आहे.....वैचारिक संभावना आहे. अडम स्मिथ म्हणतात, " the correspondance of sentiments with regard to such indifference.......concerns neither me nor my companion...." सहानुभूती मध्ये एक प्रकारचा दुरावा असतो. कारण मला स्वत:ला अशीच सहानुभूती इतरांकडून मिळत असते. 

                      सहानुभूतीचा हा पैलू महत्वाचा ह्या दृष्टीने आहे की ही  मी- पणाची मानवी भावना किती विशाल आहे आणि म्हणून सहानुभूतीचा पैंस किती संकुचित आहे, ह्याचे दिग्दर्शन होते. म्हणून असं म्हणतात की माणसाच्या सर्व भावनांचा परिपोष आणि विकास हा मी - पणाच्या सापेक्ष परिप्रेक्षातच होत असतो.

                       सहसंवेदना म्हणजे empathy ही भावना मात्र अत्यंत प्रगल्भ तर आहेच, पण मी- पणाच्या पलीकडे जाणारी मानवी संवेदनशीलता आहे. सहसंवेदना म्हणजे स्वत: च्या बाबतीत आपण जितके संवेदनशील असतो; तितकेच दुसऱ्याच्या बाबतीत असतो. म्हणून सहसंवेदना ही मानवी मनाच्या विकसनशील प्रभावाचे क्षेत्र आहे. सहसंवेदनेचे दुसरे वैशिष्ट्य हे आहे की ही भावना कृतीशील आहे. संवेदनशीलता ही केवळ मनाची अवस्था नसून ती मानवी संस्कृतीची व्यवस्था आहे. सद्भावनेच्या विविध आविष्कारातील सहसंवेदना आत्यंतिक विकास पावलेली मानवी मनाची सांस्कृतिक व्यवस्था आहे. पण ह्या भावनेला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. म्हणून सहसंवेदना मूळ सद्भावना असली तरी ती जेव्हा नकारात्मक अंगाने विकसित होते, तेव्हा तिचे परिवर्तन विपरीत, दुषित आणि हिंसक वर्तनात होऊ शकते. विशेषत: सहसंवेदना सामुहिक पातळींवर कार्यरत होते, तेव्हा ह्या भावनेचे सकारात्मक दृष्टीने नियंत्रण करणे, ही जेव्हढी आपली  वैयक्तिक कसोटी असते; तितकीच ती सामुहिक पातळीवर नेत्याची असते...

                                                      **************

  

Thursday, 13 January 2022

प्रामाणिकपणा

 

व्यवस्थापन म्हणजे जीवनातील केवळ व्यवहारच नाही, तर जगणे सुद्धा सुनियोजित, आयोजित, अग्रक्रम ठरवून आणि काळाचे भान ठरवून निर्माण केलेली जीवन व्यवस्था आहे. ह्या व्यवस्थापनामध्ये काळ आणि स्थळ ह्यांचे महत्त्व आत्यंतिक आहे. प्रामाणिकपणा, साधेपणा, विनम्रता आणि संयम, शांतपणा...हे सद्गुण आहेत, पण त्यांचे व्यवस्थापन करायचे म्हणजे त्यांचा उपयोग, ह्या गुणांचे तारतम्य, ह्या गुणांची सखोलता, व्याप्ती इत्यादी अनेक सार्वजनिक आणि खाजगी गोष्टी सक्षमपणे हाताळता आल्या पाहिजेत. तरच हे सद्गुण आपले जीवन सार्थ आणि कृतार्थ करतात.                 

           Stars can't shine unless in darkness.

        इथे तारे म्हणजे आपले सद्गुण, आपली सत्य निष्ठा, आपला प्रामाणिकपणा आणि आपले चारित्र्य ह्यांची सत्व परिक्षा संकटकाळात, आपत्ती विपत्ती आल्यावर आणि सगळे जग आपल्या विरुद्ध असतानाच होत असते...ही विपरीत परिस्थिती म्हणजे अंध:कार..

         प्रामाणिकपणा हे बुद्धीचे अधिष्ठान आहे आणि वस्तुस्थितीचा स्वीकार ही मनोधारणा आहे. ह्या दोन्हींच्या सामंजस्यातून येणारा अनुभव हा अनुभूतींमध्ये प्रवर्तित होत असतो. तेव्हा काव्याविष्कार घडत असतो. प्रामाणिकपणा अशी शक्ती आहे की ती शक्ति धारकासह सर्वांना धक्कादायक सत्य सांगत असते. सत्य आणि प्रामाणिकपणा एकच नाहीत, पण एकमेकांचे पाठीराखे नक्कीच आहेत.

          सत्य स्वयंभू, स्वसंवेद्य आहे. पण न्यायालयात मात्र सिद्ध करावे लागते....प्रामाणिकपणा हा न्याय तत्वाचा प्राण आहे. मात्र तो सिद्ध करावा लागत नाही. प्राणपणाने जपावा लागतो. सत्य तडजोड सक्षम आहे. प्रामाणिकपणाला तडजोड अमान्य असते. त्यामुळे सत्य हे असत्य झाले नाही, तरी दडवावे लागते, लपवून, झाकून ठेवावे लागते...हा अप्रामाणिकपणा आहे. म्हणून सत्याने प्रामाणिकपणाची पाठराखण सोडू नये. एकदा ही अशी संवय मनाला लागली की ती अधोगती कडे वाटचाल होऊन जाते. चारित्र्य अस्वच्छ होते आणि सत्यासत्या मधील फरक, अंतर कळेनासे होते... एक प्रकारचे अंधत्व येते, अंध भक्ती स्वार होते आणि व्यक्ती मनोरुग्ण बनून जाते.....

              प्रामाणिकपणा ही माझी नुसती श्रद्धा नाहीतर जगण्याचे एक सूत्र आहे. उदा. प्रामाणिकपणा व सत्य निष्ठा. ह्या माझ्या गेल्या ७० वर्षे जपलेल्या नैतिक आधारभूत जीवनेच्छा आहेत. ज्यावेळी वास्तवात ह्या निष्ठा असून ही माझ्यावर गुन्हेगारीचे आरोप ठेवून माझ्यावर खोटी, अप्रामाणिक आणि भ्रष्टचारयुक्त कारवाई झाली, तेव्हा मला जबदस्त धक्का बसलो. पण त्यावेळी माझ्या अंगभूत मानसिक शक्तीच्या जोरावर मी सर्व सहन केले. कालांतराने मात्र हा मनाच्या तळाशी गेलेला धक्का अचानक उसळी मारून, ज्व्लामुखीसारखा उद्रेक पावला. त्यामुळे मी कामावर असताना माझी बुद्धी, कार्यक्षमता अवगुंठीत होऊन जाऊ लागली. मी एकदम blank, शून्य होऊ लागलो. काहीच आठवत नाही, सुचत नाही, हातपाय गळून गेले आहेत....अशी अवस्था होऊन जायची. मग मी कामावरून घरी परत येत असे आणि सतत झोपून जात असे. अर्धवट जागेपण अनेकदा जाणवत असे आणि पूर्वी घडून गेलेल्या घटनांची काल्पनिक भीती स्वप्नवत माझ्या मनांत घिरट्या घालू लागत असे.

             जगण्याचा दर्जा म्हणजे नक्की काय? आपण जगण्यासाठी जी मूल्ये प्रमाण मानतो, ज्याला आपण जीवननिष्ठा म्हणतो...त्यावरून जगण्याचा दर्जा ठरत असतो. उदा. देशप्रेम, श्रद्धा, गुरुतत्व, नीतिमत्ता, प्रामाणिकपणा इत्यादी मूल्ये सकारात्मक दृष्टीने स्वीकारून त्यांच्या रक्षणासाठी प्राण सुद्धा पणाला लावणे. ह्यावरून आपली जीवनमूल्ये किंवा जीवन प्रणाली सिद्ध होत असते. ही जीवनमूल्य निष्ठा म्हणजे जगण्याचा दर्जा आणि ह्याबाबत नुसता विचार नाही तरी जीवनाची जडण घडण करणे. ह्याबद्दल परिस्थिती निरपेक्ष आपली वर्तणूक असणे, ह्यावरून आपल्या जगण्याचा उच्च किंवा निम्न दर्जा ठरत असतो.

           प्रामाणिकपणा हा गुण असतो, तेव्हा तो गरजेप्रमाणे वापरता येतो. पण प्रामाणिकपणा हा स्वभाव असतो, तेव्हा अप्रामाणिकपणा हे बळी पडणे असते.

      थोडक्यात, अप्रामाणिकपणा हा प्रामाणिकपणाला पर्याय नाही. प्रामाणिकपणा जितका संकुचिततितका भ्रष्टाचार विस्तृत होत जातो.

                       ****************

 


Thursday, 23 December 2021

समाजभान

 माणसाच्या वृत्ती आणि प्रवृत्ती कौटुंबिक आणि सामाजिक परिप्रेक्षात घडत असतात. सामाजिक परिप्रेक्ष म्हणजे लोकांची मते, विचार, संकल्पना इत्यादी गोष्टींवरून आपली मते घडत जातात. परंतु आपण जेव्हा आपल्या व्यक्तिगत धारणा, विचार, संकल्पना इत्यादी गोष्टी आपण सामाजिक विचार प्रवाहांच्या संदर्भात तपासून न पाहता जशाच्या तशा स्वीकारतो ,तेव्हा आपण प्रवाहपतित होत असतो. 

                     मुळात आपण हे समजून घेत नाही की मी ही एक स्वतंत्र व्यक्ती असून, समाजाचे आणि माझे नाते काय आहे ? त्यामुळे, लोकांच्या मतांवरून ठरविलेली आपली अनुमाने, निष्कर्ष किंवा संकल्पना चुकीच्या आहेत, हे जेव्हा सिद्ध होते; तेव्हा मात्र आपल्या एकट्यालाच चुकलेल्या गोष्टींची फळे भोगावी लागतात. आपली मते, विचार, संकल्पना आपण किती प्रमाणात समाजाकडून मान्यता घेऊन सत्य - असत्य ठरविणार? ह्याचे भान न ठेवल्यामुळे जे काही भोगावे लागते, त्याला समाज नाही, तर आपण एकटेच जबाबदार असतो.

                       समाज आणि मी ह्यांचे नाते विविध पातळींवर कार्यरत असते आणि हे नाते नेहमीच एकोप्याचे नसते. कारण समाज ज्या विचारप्रवाहांवर कार्यरत असतो, त्यापेक्षा वेगळ्या पातळीवर आपली वैयक्तिक जडणघडण झालेली असते. समाजाची मते ही बहुसंख्याक वादी असतात. ह्या बहुसंख्याकात वैयक्तिक विचार करणारे आणि त्या विचारांप्रमाणे समाजा बरोबर जाणारे अधिक असतात आणि विरुद्ध जाणारे फार थोडे असतात. कारण प्रत्येक माणसाची मनोबुद्धी एकसमान नसते. परंतु ज्याला ह्याची जाणीव असते की माझी प्रज्ञा, बुद्धी ही समाज म्हणतो, त्या विरुद्ध आहे; त्याला म्हणजे त्या व्यक्तीला समाजभान आहे, असे म्हणतात. 

                   थोडक्यात,समाज काय म्हणतो आणि मी काय म्हणतो; ह्यातील अंतर म्हणजे समाजभान होय.

                                                                   **************